Wednesday 9 July 2014

श्री क्षेत्र देवगड़ संस्थान

                ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती देणारे देवगड़ हे एक प्रसन्न तीर्थक्षेत्र आहे. तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर(महाराष्ट्र) येथे या ईश्वरी साक्षात्काराची प्रचीती तुम्हाला नक्कीच मिळेल.


             संत परंपरेला समृद्ध करणारे अलीकडच्या काळातील महान संत समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा.देवगडजवळच्या गोधेगावात १९०७ साली सत्शील माता-पित्यांच्या पोटी जन्म घेउन त्यांनी स्वत:सहसमाजाच्या कल्याण्याचा ध्यास घेतला. प्रवरेच्या पात्रात सतत १२ वर्ष श्री शंकराची आराधना करणा-याबाबांनी समाजाला साधानेतिल सातत्याचा सल्ला दिला. अत्यंत साधी रहाणी आणि सात्विक भोजनाचाआग्रह धरून देहवाद सोडला पाहिजे हे शिकविले. पूजनीय किसनगिरी बाबांनी सामान्यांना श्रधेसहजगण्याची शिकवण दिली. आपल्या वैराग्यसंपन्न वर्तनातून जगण्याचा मापदंड घालून दिला.देवगडलाश्रीद्त्तप्रभूंच्या मंदिराची उभारणी करुन संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली. ज्या प्रवरेतीरी नेवासा येथे श्रीज्ञानदेवांनी गीतेचा उपदेश सोपा करुन सांगितला तोच उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणून त्याच प्रवरेच्याकाठी देवगड़ येथे समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी आदर्श जीवनाचा परिपाठ घालून दिला. अखंडनामस्मरण, सर्वकल्याणाचा ध्यास आणि लोकहिताचा उपदेश हेच त्यांचे जीवन होते. 

            आपली जीवनयात्रा १९८३ मध्ये संपवताना समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी इश्वरनिष्ठांची मंडियाळीउभी केली होती. विश्वकल्याणाचा ध्यास घेतलेल्या सतशिष्यांचा मेळा जमवला होता. तळागाळातीलसामान्यालाही अध्यात्म सोपे आहे, असे समजावून मुख्य प्रवाहात सामिल करुन घेतले होते. 

                   सत्पुरुषांचे लौकिक जीवन देह्त्यागाने संपले, तरीही समाधिरुपाने त्यांचे अलौकिक जीवन निरंतर,अक्षय असते. सत्पुरुषांच्या समाधिस्थळी भाविकांना श्रधेच्या बळाने त्यांचे वास्तव्य अनुभवता येते. हाअनुभव देणारे समर्थ किसनगिरी बाबांचे समाधी मंदिर.