Friday 25 April 2014

श्री विठ्ठल-रुख्मिणी (धाकटी पंढरी) मंदीर





शेवगाव तालुक्यातील वरुर बु. मधिल हे मंदीर संपुर्ण गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे.





आख्यायिका:
वरुर गावचा खांबट नावाचे पाटील होते. एके दिवशी त्यांच्या स्वपनात विठ्ठल-रुक्मिणी आले व सांगीतले कि "आम्ही काळेगाव टोका गावातील एका इस्माच्या उकांड्यामध्ये आहोत. "पाटील दुसऱ्यादिवशी त्या ठिकाणावर गेले व ती जागा विकत घेतली व तेथे खोद्ण्यास सुरवात केली. खोदत असताना मुर्तीच्या डाव्या डोळ्यावर कुदळीचा घाव लागला, मुर्तीच्या डोळ्यातुन रक्त वाहु लागले. मग मुर्ती थोड्या वर काढल्या. ही गोष्ट कळाल्यावर काळेगाव टोकातील गावकरी तेथे गोळा झाले व त्यांनी मुर्ती गावाबाहेर नेण्यास विरोध केला आणि मुर्ती बैलगाडीत टाकल्या, त्या गाडीचा चकणाचुर झाला. तरीसुध्दा विरोध कायम होता. मग खांबट पाटील मागारी निघाले. जसे पाटील मागारी फ़िरले तशी मुर्ती गायब झाली. हा चमत्कार घडल्यानंतर काळेगाव टोकातील मंडळींनी पाट्लांना थांबवले व मुर्ती नेण्यास परवानगी दिली तेव्हा मुर्ती पुन्हा वर आलेली दिसु लागली. मग मुर्ती गावात वाजत-गाजत आणण्यात आली व तिची स्थापणा करण्यात आली.
आषाढी-पोर्णिमेला काल्याच्या दिवशी मंदीरामध्ये भजन चालु असताना मुर्तीच्या अंगावर घाम येतो, असे गावक्ऱ्यांचे म्हणने आहे.. हे खुप जागृत मंदीर आहे.