Friday 25 April 2014

श्री विरभद्र (बिरोबा) देवस्थान, मिरी


श्री विरभद्र मंदीर हे मंदीर पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावातील प्रसिध्द मंदीर आहे. या मंदीराला आतल्या बाजुने काचकाम केलेले आहे.

आख्यायिका :
राजस्थान मधील घोडगिरी येथे भुत्तीरबुआ होते. राजस्थान मधील काही लोकांनी भुत्तीरबुआंच्या कावडींना विरोध केला. त्यावेळेस त्यांनी येथे राहणार नाही असे ठरवले. आधी ते नेवासा येथे आले व धनगरवाडीत बसले, परंतु त्यांना कोणी ओळखु शकले नाही .त्यांनी नंतर कोल्हारला मुककाम केला. मग त्यांनी जिथे मन रमेल तेथे राहण्याचे ठरवले, मिरी येथे त्यांना मेंढरे दिसली, त्यांनी येथेच राहण्याचे ठरवले. मग ते कै.मनाजी भगत यांच्या स्वप्नात दर्शन दिले व मंदीर बांधण्यास सांगितले. बिरोबा त्यांच्या अंगात यायचे व अंगावर लाकडी तलवारीचे वार घ्यायचे. इंग्रज अधिकारयाला ही गोष्ट खोटी वाटु लागली. त्याने स्वत:हा त्यांच्या अंगावर लोखंडी तलवारीने वार केले, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.
दसरयानंतर ५ दिवसांनी (कोजागिरी पोर्णिमेला )  येथे वैख असतो. हा वैख ऎकण्यासाठी  आसपासच्या गावातील लोक गर्दी करतात.
या दिवशी  श्री सिताराम मनाजी भगत यांना देवाचे वारे येते, त्यावेळेस ते अंगावर तलवारीचे वार घेतात व वार्षिक भविष्य(पाऊस,नैसर्गिक आपत्ती, किंवा देशात काही  बदल होणारे ) सांगतात. हे मंदीर गोपाळराव मिरीकर यांच्या जागेत आहे. जत्रेच्या दिवशी गावातुन त्यांची मिरवणुक निघते.